महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत करत 'कानाखाली वाजवण्याची' भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. यानंतर भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचा दावा भाजपने केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केले, तो प्रकार म्हणजे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दबूनही जाणार नाही. हे लोकं जन-आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, आमचा प्रवास चालूच राहणार.
हेही वाचा- अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
महाराष्ट्र सरकार द्वारा केंद्रीय मंत्री नारायण राणे जी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन है। इस तरह की कार्यवाही से ना तो हम डरेंगे, ना दबेंगे।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 24, 2021
भाजपा को जन-आशीर्वाद यात्रा में मिल रहे अपार समर्थन से ये लोग परेशान है।
हम लोकतांत्रिक ढंग से लड़ते रहेंगे, यात्रा जारी रहेंगी।
एकिकडे महाराष्ट्रातले काही मंत्री कायदे सर्वोच्च स्थानी असल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करणं, नागरिकांचा जीव धोक्यात टाकणं हेच कायदे आहेत का? एका केंद्रीय मंत्र्यावर ३०-४० एफआयआर दाखल करणं, हे कायदे आहेत का? असं म्हणताना भाजपनं राणेंना पाठिंबा व्यक्त केला.