शहर विद्रुप करणा-या बॅनरबाजांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र या आदेशाचा सत्ताधारी भाजपाला विसर पडलेला दिसतोय. आज घाटकोपर आणि कांदिवली येथे होणा-या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलीय. वांद्रे खेरवाडी पासून वेस्टन एक्सप्रेस हायवेवर हे बॅनर झळकताना दिसताहेत.
या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार पूनम महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, आशिष शेलार या भाजपा नेत्यांचे चेहरे झळकताहेत. बॅनरबाजी करू नका, असे न्यायालयाचे आदेश असतानाही अशा बेफिकीर राज्यकर्त्यांना कधी जाग येणार, असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारण्यात येतोय.