मुंबई महापालिकेची मुदत सोमवार ७ मार्च रोजी संपणार आहे. निवडणूक न झाल्यानं मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येईल. तसेच मुंबईत आमचा भगवाच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
''ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काम करत आहेत. त्यामुळं किमान मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता येणारच'', असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. मुंबईकर आमच्या सोबत आहेत. तसंच, महापौर शिवसेनेचाच होईल. ती मी असेल किंवा दुसरं कोणी हे पक्ष प्रमुख ठरवणार. असं पत्रकार परिषेत पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पेडणेकर यांनी म्हटलं.
ज्यांच्यावर धाडी पडल्या किंवा पडणार होत्या ते भाजपात गेले साधू झाले, शुद्ध झाले. पर्याय असा आहे की, एक तर आमच्यात या नाही तर हे (कारवाईला तयार रहा) घ्या. मात्र आम्ही सैनिक आहोत. यशवंत जाधव हे भीम सैनिक आहेत, भीम पुत्र आहेत. ते लढतील. जे सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल. ही कायद्याची आणि कागदाची लढाई असल्याचंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.