Advertisement

महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात - शरद पवार

विद्यार्थ्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, या निवडणुका घेण्याबाबत सरकारने पावले उचलावीत

महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात - शरद पवार
SHARES

महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचे भविष्य ठरवण्याची ताकद तरुणांमध्ये आहे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, या निवडणुका घेण्याबाबत सरकारने पावले उचलावीत असे आवाहनही त्यांनी सरकारला केले. सुरुवातीला ५ वर्ष अभ्यास करून सदनात गलो मग सत्तेतच संधी मिळाली, त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात चढ उतार येत असतात, पराभव झाला तर नाउमेद होऊ नये, पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज व्हावे असे त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले. हा आगळा वेगळा कार्यक्रम, संवाद साधण्यासाठी आलो, मनापासून आनंद, तुमची पीढी आणि माझी पीढी याच किती अंतर हे जाणून घ्यायचंय. वय ८0 झाले पण विचार पद्धती जूनी नसल्याचे ते म्हणाले. २२ फेब्रुवारी रोजी ५२ वर्षांपूर्वी याच दिवशी मी विधानसभेवर आमदार झालो होतो अशी आठवणही त्यांनी करुन दिली. ५0 वर्षात अनेक घटना घडल्या, अनेक संधी मिळाल्या.

कानाकोपर्‍यात जाऊन युवकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली मला मिळाली हे भाग्याचे असल्याचे ते म्हणाले. मी अभ्यास सोडून सगळय़ात पारंगत होतो, खेळ, निवडणूक, व्याख्यान आयोजित करणे यात पुढे होतो. साचेबंद अभ्यासक्रमातून बाहेर पडले पाहिजे, आव्हान पेलण्याची आणि आत्मविश्‍वास निर्माण व्हावा असा अभ्यासक्रम असावा अशी गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.


राष्ट्रवादीत ही अंतर्गत वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील महापोली येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या या नाट्यमय वादावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत मला अंधारात ठेऊन काही करू नका, असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा