Advertisement

राज्य सरकार नथुरामाच्या विचाराचे - सचिन सावंत


राज्य सरकार नथुरामाच्या विचाराचे - सचिन सावंत
SHARES

मुंबई - 'हे राम नथुराम' या नाटकाविरोधात शांततापूर्ण अहिंसक निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडू असा इशारा देणारे सरकार नथुरामांच्या विचाराचे असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्यासाठी काही मंडळींकडून 'हे राम, नथुराम' या नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरु आहेत. रविवारी नागपूरमध्ये होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेसने विरोध केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते शांततापूर्ण आणि अहिंसक पद्धतीने महात्मा गांधी की जय असे नारे देऊन आंदोलन करीत होते. परंतु मनात नथुराम असलेल्या सरकारला महात्मा गांधीजींचा जय जयकार ही असह्य होऊ लागलेला आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा