उपराष्ट्रपती (vice president) पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची 15 मतं फुटली आहेत. सत्ताधारी भाजपचे (bjp) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना तब्बल 452 मतं मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना केवळ 300 मतं मिळाली.
इंडिया आघाडीच्या सर्वच्या सर्व 315 खासदारांनी मतदान केल्याची माहिती काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात रेड्डी यांना 300 मतं मिळाली आहेत. याचा अर्थ इंडिया आघाडीची 15 मतं फुटली आहेत.
इंडिया आघाडीच्या फुटलेल्या 15 मतांमध्ये महाराष्ट्रातील (maharashtra) मतांचा समावेश असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये शिवसेना उबाठाच्या खासदारांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंचे (uddhav thackeray) लोकसभेतील (loksabha) 9 पैकी 6 खासदार संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या (narendra modi) बैठकीत केला होता.
याच खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केल्याची दाट शक्यता आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून भाजपने एकाच दगडात चार पक्षी मारले आहेत.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्हिप नसतो. त्यामुळे खासदार मतदान करण्यास स्वतंत्र असतात. ठाकरेंचे खासदार क्रॉस व्होटिंग करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
आता निवडणुकीत इंडिया आघाडीची 15 मतं फुटल्यानंतर संशयाची सुई ठाकरेंच्या खासदारांकडे वळली आहे. ठाकरेंचा पक्ष पुन्हा एकदा फुटू शकतो, असा मेसेज या निवडणुकीतून भाजपनं दिलेला आहे.
याशिवाय शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांबद्दलचा संशयदेखील वाढला आहे. कारण गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी शपच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीची मतं फोडून भाजपनं विरोधकांच्या एकीला सुरुंग लावला आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत मतचोरीच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडी रस्त्यावर उतरली होती.
त्यावेळी इंडिया आघाडीची एकजूट दिसली होती. पण महिन्याभरानंतर झालेल्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. इंडिया आघाडीला आपले खासदार सांभाळता आलेले नाहीत, असा स्पष्ट मेसेज या निवडणुकीतून गेला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल 31 जागा मिळाल्या. तर सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानं महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे.
मविआचे (MVA) अनेक खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मविआची अवस्था तोळामासा झालेली आहे. ती पाहता काही खासदार पक्षांतराचा विचार करु शकतात. ते खासदार कोण असतील, कोणते खासदार पक्षाची साथ सोडू शकतात, याची चाचपणी या निमित्तानं भाजपनं केलेली आहे.
हेही वाचा