Advertisement

नोटांबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज - गडकरी


नोटांबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज - गडकरी
SHARES

नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज झाल्याची टीका केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात पैसा बँकेत जमा झाला असून, तो पैसा काळा पैसा असल्याच्या संशयातून सध्या पैशाची चौकशी सुरू असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हंटलं आहे. नोटाबंदीमुळे काही लोकांना त्रास झाला. परंतु अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. नोटाबंदीनंतर १.३८ लोकांनी ५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. तसंच 'नोटाबंदीनंतर काश्मीरमधील दगडफेक कमी झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितलं.


डिजिटल व्यवहारांना चांगला प्रतिसाद -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णयघेतल्यानंतर केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना दिली. लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला असून, नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारामध्ये 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोलनाक्यावर, भाजीवाले, चहावाले सगळेचजण कॅशलेस व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बाब असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. लोकांचे वाढते डिजिटल व्यवहार पाहता पुढील दोन-तीन वर्षांत रिझर्व्ह बँकेला नोटांची छपाई करावी लागणार नाही, असंही नितीन गडकरी पुढे म्हणाले. नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.


सत्ता गेल्यामुळे राहुल अस्वस्थ -

राहुल गांधीना रडू द्या, कारण ते आणि त्यांची पार्टी आता बेरोजगार झाली आहे त्यामुळे ते आता अस्वस्थ असल्याची टीका गडकरी यांनी यावेळी केली.


हेही वाचा - 

८ नोव्हेंबर आणि नोटाबंदीसंदर्भातील 'या' ८ गोष्टी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा