Advertisement

‘याला’ धमकी समजा वा सल्ला…, मनसेच्या ‘या’ नेत्याने दिला कंगनाला इशारा

माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिला इशारा दिला आहे.

‘याला’ धमकी समजा वा सल्ला…, मनसेच्या ‘या’ नेत्याने दिला कंगनाला इशारा
SHARES

‘याला’ धमकी समजा वा सल्ला...माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिला इशारा दिला आहे. कंगनाने आपल्या ट्विटर हँडवरून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरून सध्या तिच्यावर चोहोबाजूंना टीका करण्यात येत आहे. (mns leader amey khopkar warned actress kangana ranaut over bad comment on mumbai police )

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे. तसंच मला मुंबईत येऊ नये असंही बजावलं आहे. मला मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असं वक्तव्य कंगना राणावतने केलं होतं. 

त्यावर अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे की, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरून घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहे माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे, केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो, पाऊस असो... कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला या माझ्या मुंबई पोलिसांची भीती वाटते, त्यांनी खुशाल आपापल्या राज्यांत जाऊन असुरक्षित राहावं. ‘याला’ धमकी समजा वा सल्ला...माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही. असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

हेही वाचा - आम्ही पोकळ धमक्या देत नाही, संजय राऊतांचा कंगनाला इशारा

त्याआधी मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला इथं राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. १९९२ ची दंगल असो किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांनी बलिदान देऊन लोकांना वाचवलं आहे. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही, वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा - “मुंबई पोलिसांवर बोलणारी कंगना कोण लागून गेली”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा