Advertisement

एलआयसी भरती : हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध

महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची भरती झाल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा मनसेनं दिला आहे.

एलआयसी भरती : हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध
SHARES

एलआयसीने नुकतंच देशभरात साडेसात हजारांहून अधिक पदं भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. या भरतीत मुख्य परिक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची भरती झाल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा मनसेनं दिला आहे. 

 दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील उमेदवारांना हिंदीची सक्ती नसल्याने इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याची दखल घेऊन  इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. महाराष्ट्रातील मुलांना हिंदी भाषेची सक्ती केली आहे हे अत्यंत संतापजनक आहे. उत्तर भारतीयांचा प्रत्येक स्थानिक भाषा, संस्कृती डावलण्याचा डाव आहे, असं म्हणत नांदगावकर यांनी या सक्तीचा निषेध केला आहे.  महाराष्ट्रामध्ये जर हिंदी भाषिकांची भरती केलीत तर होणाऱ्या परिणामांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार नसेल, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.

View this post on Instagram

आज सकाळी माझ्या एक बातमी वाचण्यात आली कि, LIC ने मोठ्या प्रमाणावर भरतीसाठी जाहिरात दिली आहे जवळ जवळ ७५०० हजार पद ह्यामाध्यमातून भरली जाणार आहेत परंतु ह्या मुख्य परिक्षेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील मुलांनासुद्धा हिंदी भाषेची सक्ती ठेवली आहे कि जे अत्यंत संतापजनक आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे सांगतायेतना ते हेच, ह्या उत्तर भारतीयांचा प्रत्येक स्थानिक भाषा, संस्कृती डावलण्याचा डाव आहे त्याचाच हे उत्तम उदाहरण आहे. वास्तविक पाहता LIC हि केंद्र सरकारची कंपनी आहे आणि केंद्र सरकार हे काही ठराविक राज्यांच नसून संपूर्ण देशाच आहे मग अस असताना भाषेची सक्ती का? आपला देश हा वेगवेगळ्या राज्यांचा मिळून बनला आहे ज्यामध्ये प्रत्येक राज्याची एक संस्कृती व भाषा आहे, त्या त्या राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात तिथल्या तरुणांना स्थानिक भाषेमध्ये शिक्षण मिळते असे असताना नोकरीसाठी त्यांना अन्य भाषेची सक्ती करणं हा कसला प्रकार आहे? याचा सरळ सरळ अर्थ असा होतो कि तुम्हाला हिंदी भाषिक तरुणच हवेत आमचे मराठी तरुण नकोयेत तुम्हाला. काही दिवसांपूर्वी भारताचे गृह मंत्री व भा.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ह्यांनी सुद्धा एक देश एक भाषा ह्यावर वक्तव्य केलं परंतु सर्व स्तरांतून होणारा विरोध लक्षात घेता त्यांनी हे विधान मागे घेतलं, तर मग LIC च्या अधिकाऱ्यांमध्ये ही मग्रुरी आली कुठून? गेल्या पंधरा वर्षांत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया या भारतातील सहा राज्यभाषांना केंद्र सरकारने 'अभिजात भाषा' म्हणून घोषित केले आहे, मराठीला हा दर्जा मिळावा म्हणून ५-७ वर्षे लढा देऊनही सरकारने त्यावर निर्णय दिला नाही दरम्यान दोन सरकारं बदलली तरी मराठीची अहवेलना थांबली नाहीये आणि त्यावर अश्या बातम्या येणं म्हणजे 'जखमेवर मीठ चोळण्यासारख' आहे. ह्या सर्व गोष्टींमधून तुम्ही काय दाखवत आहात? आम्ही ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही. LIC च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर हिंदी भाषिकांची भरती तुम्ही केलीत तर होणाऱ्या परिणामांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार नसेल हे सरकारने नीट ध्यानात घ्याव. #बाळा #नांदगावकर #बाळानांदगावकर #मनसे #bala #nandgaonkar #balanandgaonkar #mns #licofindia #india #maharashtra #pune #mumbai #nashik

A post shared by Bala Nandgaonkar (@bala_nandgaonkar) on



हेही वाचा  -

पवारांनी मानले शिवसेनेचे आभार

ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा