Advertisement

मुंबईतील एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारला विकली जाण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री कार्यालये एअर इंडियाच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरू असून खाजगी इमारतीतील सर्व कार्यालये मंत्रालयात येतील.

मुंबईतील एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारला विकली जाण्याची शक्यता
(File Image)
SHARES

महाराष्ट्र सरकार नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत विकत घेण्याच्या आणि मंत्रालयाच्या विस्तारात रूपांतरित करण्याच्या तयारीत आहे. इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या 1,600 कोटी रुपयांच्या अंतिम ऑफरला तत्त्वतः सहमती दर्शवली होती.

राज्याने गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना1,600 कोटीची ऑफर दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील सरकारने सुमारे 1,450 कोटी रुपये देऊ केले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्री कार्यालये एआय भवनमध्ये स्थलांतरित केली जाऊ शकतात आणि खाजगी इमारतींमधील सर्व कार्यालये मंत्रालयात सामावून घेतली जाऊ शकतात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला ते विकण्याच्या प्रयत्नात प्राधान्य देण्याची विनंती केली होती.

“आम्हाला सांगण्यात आले आहे की, एआय अॅसेट होल्डिंग लिमिटेडने आम्हाला ते देण्यास तत्त्वत: सहमती दर्शविली आहे. काही अधिक तपशीलांवर काम केले जाईल परंतु आमची ऑफर सशर्त आहे. आम्हाला सांगण्यात आले की तेथे जीएसटी आणि आयटी विभागाची कार्यालये आहेत.  ताबा मिळाल्यावरच आम्ही कराराला पुढे घेऊन जाऊ.

एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी राज्य सरकारला सांगितले होते की त्यांच्या मते या इमारतीची किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. राज्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करणे आवश्यक आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर, एमव्हीए सरकारच्या अंतर्गत 2021 मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, परंतु कोणताही करार झाला नाही.

नरिमन पॉइंट येथे मंत्रालयाजवळ ही आलिशान इमारत आहे. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातही ही इमारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता. मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश होता. विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात सत्तापरिवर्तन झाल्याने खरेदीची चर्चा सुरू होती आणि हा व्यवहार पुढे जाऊ शकला नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा खरेदी प्रक्रिया पुढे नेली आहे.



हेही वाचा

माझ्या हत्येसाठी उद्धव ठाकरेंचा सुपारी देण्याचा प्रयत्न, नारायण राणेंचा मोठा आरोप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा