कोरोनाविरोधात (COVID 19) लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ९ मिनिटांचा वेळ मागितला होता. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं होतं. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घरातले लाईट्स ऑफ करुन दिवे लावून एकात्मतेचं दर्शन घडवलं. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी रात्री ९ वाजताचा महाड इथल्या चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे.
संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसुर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच... आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, #जय_भीम #अब_आगे_क्या, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
मोदी विरोध करता करता एक दिवस थकशील. यडा कि खुला सारा देश मोदींबरोबर.तुझ्यासारखे मोजके नेते कावकाव करत आहेत.प्रधानमंत्री आहेत देशाचे त्याच्यावर टिका करायलाही पात्रता लागते.ति पात्रता तुझ्यात नाही.प्रधानमंत्र्यासमोर तु एक ग्राम पचायत सदस्य वाटतो.तुझी राजकिय उंची काय बोलतो किती.
— छत्रपतीं शिवाजीमहाराज भक्त vijay (@VijayUgale12) April 5, 2020
मंत्री महोदय इथे सुद्धा झालात का सुरू....असो संपूर्ण देश आज पुन्हा एकवटला...अगदी बाबासाहेबाना सुद्धा या देशाबद्दल अभिमान वाटला असेल...हा तोच देश माझ्या विचारसरणी नुसार मार्गक्रमण करतोय...जय भीम जय भारत...
— Prasad (@PrasadDangare) April 5, 2020
तिथल्या लाईट्स बंद करायच्याच नव्हत्या. मागच्या घरांमधल्या लाईट्स बंद आहेत! मिशन सक्सेसफुल😛
— Suchikant 🇮🇳 (@Suchikantimp) April 5, 2020
साहेब , घरात ल्या लाईट घालवायचा होत्या. लोक मंद असतात माहिती होत.... पण हे जरा जास्तच झालं🤣😂 काळी झाली का पाहून घ्या एकदा.
— Saurabh Bhoy (@saurabh_bhoy) April 5, 2020
आव्हाड जी घर की बिजली बंद करणी थी आप कहा चौक मे पोहोच गये ! मोदीजी को थोडा ध्यान से तो सुनो !🤨😷
— चौकीदार Santosh Darekar (@SRashtra) April 5, 2020
'भारतानं कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होतं. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल
म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा.
देशाला इतकेही मुर्खात काढू नका. pic.twitter.com/ZDOgvQDzPK
'जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा', अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली आहे. लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा', असं म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली होती.
हेही वाचा