Advertisement

''एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण'', रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला इशारा

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.

''एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण'', रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला इशारा
SHARES

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. भाजप नते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. त्यातच मंगळवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संपाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात हजेरी लावली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ''एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण'', अशा शब्दात आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.

एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ''ठाकरे सरकारला जागं आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल'', असा इशारा दिला. शिवाय, शरद पवार यांनी या प्रश्नाकडं लक्ष द्यावं असंही म्हटलं. ''एसटी नसती तर मी पुढारी नसतो. जय भीम आहे माझ्या गाठीशी, मी तुमच्या आहे पाठिशी, सरकारला सळो की पळो करुन सोडा'', असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं.

''हे सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झालं असतं, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही'', असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा