Advertisement

सत्तासंघर्षाच्या वादानंतरही रश्मी ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंच्या नवरात्री मंडपाला भेट

रश्मी ताईंसोबत इथं गर्दी करण्यासाठी शिवसेना मुंबईतून कार्यकर्ते आणणार आहेत, असा आरोप माजी नगरसेविका आणि शिंदे कॅम्पच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला.

सत्तासंघर्षाच्या वादानंतरही रश्मी ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंच्या नवरात्री मंडपाला भेट
SHARES

एकिकडे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात खरी शिवसेना कुणाची यावरून सत्तासंघर्ष पेटला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे गुरुवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रीच्या मंडपात भेट देणार आहेत.

टेंभी नाका येथील या सोहळ्याचा शुभारंभ पक्षाचे दिवंगत ठाणेदार आनंद दिघे यांच्या हस्ते करण्यात आला. या उत्सवाची धुरा आता शिंदे गटाने घेतली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोमवारी मिरवणुकीचे नेतृत्व शिंदे यांनीच केले.

शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, टेंभी नाका इथं रश्मी ताई या देवीची आरती करणार आहेत. त्याव्यतिरिक्त, रश्मी ताई पक्षाचे ठाणे खासदार राजन विचारे यांनी उभारलेल्या पंडालला देखील भेट देणार आहे. ते पुढे म्हणाले की, "त्या दरवर्षी हे करतात."

शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात शिवसैनिकांची फारशी उपस्थिती नसते. त्यामुळे रश्मी ताईंसोबत इथं गर्दी करण्यासाठी शिवसेना मुंबईतून कार्यकर्ते आणणार आहेत, असा आरोप माजी नगरसेविका आणि शिंदे कॅम्पच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला.

रश्मी ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला सेनेच्या कार्यकर्त्या येतील असा दावा त्यांनी केला. “पक्षावर ही वेळ का यावी? मुंबईतील महिलांना ठाण्यात का पाठवायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जूनमध्ये शिंदे गटाने बंडखोरी केली. त्यानंतर पक्षात उभी फूटच पडली, त्यामुळे रश्मी ठाकरे पक्षाच्या राजकीय सभा आणि रॅलींपासून मोठ्या प्रमाणात दूर राहिल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या पक्षाचे मुखपत्र सामनाच्या प्रमुख होत्या. पण नंतर त्या पदावरून पायउतार झाल्या.



हेही वाचा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जीभ घसरली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा