
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये:
यांचा समावेश आहे.
हा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे (Eknath Shinde), श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, या सहा खासदारांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेची लोकसभेतील खासदार संख्या 7 वरून 13 झाली आहे.
सारनाईक म्हणाले, "यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. 'ऑपरेशन टायगर' वर्षभर सुरू असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे हे सहा खासदार आज शिवसेनेत दाखल होत आहेत."
तसेच या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बीर्ला (Om Birla) यांच्याकडे पत्र सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, या घडामोडीनंतर ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, "आज आमचे खासदार आणि आमदार फोडले जात आहेत कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलायचे आहे. 2024 मध्ये मतदारांनी त्यांना रोखले, त्यामुळे आता पक्ष फोडून दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे."
आदित्य ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांवर टीका करत त्यांना "डरपोक आणि बिकाऊ" असे संबोधले.
ते म्हणाले, "हे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नावावर निवडून आले. आता भाजप त्यांना आपल्या दलदलीत ओढून लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे."
पक्षफोडीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, "ज्या पद्धतीने आमचा पक्ष फोडला गेला, त्याच पद्धतीने इतर पक्षांनाही लक्ष्य केले जात आहे. देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात असेल, तर आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे."
सहा खासदारांच्या पक्षांतरामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढल्याने शिंदे गटाची ताकद वाढली असली, तरी या घडामोडीमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा
