मुंबई - राज्यातील सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, त्यानंतर आदेश देऊ, असं मुंबई हायकोर्टाने अण्णा हजारेंच्या याचिकेवर स्पष्ट सांगितलं.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप अण्णांनी केला होता. अण्णांनी याचिकेत सहकारी कारखान्यांच्या खासगीकरणावर आक्षेप घेतला होता.