वरळी - वरळीतील दूध डेअरी इथं शेतकरी आठवडे बाजार सुरु करण्यात आलाय. नागरिकांना भाजी आणि फळे कमी दरात मिळावेत, म्हणून हा आठवडा बाजार सुरु करण्यात आलाय. तसंच शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्याची थेट संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आठवडे बाजाराचं आयोजन करण्यात आलंय. आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते या बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी कृषी, फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. हा आठवडा बाजार दर रविवारी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत भरणार आहे. त्यामुळे नागरिक,माल विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.