Advertisement

जातीयवाद्यांना निवडणुकीत खाली खेचा - आझमी


जातीयवाद्यांना निवडणुकीत खाली खेचा - आझमी
SHARES

मुंबई - पालिकेत सत्तेवर असलेले शिवसेना आणि भाजपावाले आपल्या जातीय राजकारणासाठी आता शालेय विद्यार्थ्यांचा वापर करू लागले असून, अशा जातीयवादी सत्ताधाऱ्यांना आगामी पालिका निवडणुकीत सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केले आहे. नाताळाच्या दिवशी पालिका शाळांमधील उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सुट्टी न देण्याच्या पालिका प्रशासनाच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केलीय. सोमवारी मुंबईतील पालिका शाळांमधील मराठी आणि हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांना नाताळानिमित्त सुट्टी देण्यात आली होती. मात्र पालिकेच्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना नाताळाची सुट्टी न देता शाळा सुरु होती. पालिकेच्या कारभारावर भाष्य करताना अाझमी म्हणाले की, खरे तर मुलांमध्ये एकतेची भावना रुजवणे याला प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र पालिका प्रशासन जर शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जातीय आधारावर भेदभाव करत असेल, तर ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे. पालिका प्रशासनामार्फत घेतलेले अशा पद्धतीचे निर्णय पाहता पालिकेतील सत्ताधारी आपल्या जातीयवादी राजकारणासाठी महापालिका शाळांमधील मुलांचाही वापर करत आहेत, ही बाब स्पष्ट होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा