Advertisement

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या कारवाईनंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. शिवाय पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला.

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. शिवाय पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला.

अटकेपूर्वी नारायण राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथंही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नारायण राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

अटकेनंतर टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीशी व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून बोलताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन. ते कायम थोडेच मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्हीसुद्धा राजकरणामध्ये आहोत, असं म्हणत अप्रत्यक्ष इशाराही दिला.  

हेही वाचा- अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

अटेकच्या प्रसंगाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं, संगमेश्वरमधील येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प इथं दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथं डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत असल्याचं मला सांगितलं. मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथं अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड इथं नेलं जात आहे, असं राणे म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्य करुन तुम्ही चूक केल्याचं वाटतंय का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, मी कानाखाली मारेल असं म्हणालो नव्हतो. हा कितवा १५ ऑगस्ट आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं हे चुकीचं असल्याचं म्हटलं. त्यांनी सेक्रेटीला विचारावं हे चूक असल्याचं मी म्हटलं होतं. आधीच त्यांनी वाचून यायला हवं होतं, असं मत मी मांडलं. तसंच मी तिथं असतो तर कानाखाली मारली असती असं म्हणालो होतो, असं राणे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा