Advertisement

मिशन बिगीन अगेन: राज्यात ई-पासशिवाय प्रवासाला मुभा, मेट्रो बंदच राहणार

अनलॉकचा चौथा टप्पा १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत.

मिशन बिगीन अगेन: राज्यात ई-पासशिवाय प्रवासाला मुभा, मेट्रो बंदच राहणार
SHARES

राज्य सरकारनं अनलॉक-4 (Unlock-4) च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये सरकारन ई पास रद्द केला आहे. अनलॉकचा चौथा टप्पा १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत.

अनलॉक-4 मध्ये कुठली मुभा?

मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची संख्या १ सप्टेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे.

  • मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे पिंपरी या क्षेत्रांमध्ये ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थिती राहता येईल.
  • हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार.
  • खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा
  • आता आवश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच या नियमावलीचे पालन करतील..
  • त्याव्यतिरिक्त इतर राज्यात ५०  टक्के आता कर्मचारी उपस्थित राहू शकतात या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील.
  • प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा.
  • खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा.

कुठली मुभा नाही?

  • जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज नसणार आहे.
  • शाळा आणि कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार.
  • सिनेमागृह ३० सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच.
  • मंदिर आणि जिमबद्दल अद्याप कोणतीही घोषणा नाही.
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम
  • सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही.
  • ५० पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही.
  • अंत्यविधी यासाठीदेखील 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा