मुंबईत - इंग्लडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतानं इग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय. 5 मालिकेच्या सामन्यात भारतानं 3-0 अशी आघाडी घेतं मालिका खिशात घातलीय. द्विशतक झळकवणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला. भारतानं एक डाव आणि 36 धावांनी इग्लंड संघाला पराभूत करत मुंबईकरांना विजयाची मेजवानी दिलीय. आर. अश्विननं एका डावात 5 गडी बाद करत कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला.