Advertisement

भारत VS इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड


भारत VS इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड
SHARES

मुंबई - इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. चिकुनगुनियातून सावरलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघात परतलाय. तर गौतम गंभीरलाही संघात स्थान टिकवण्यात यश मिळालं आहे. तसंच दुखापतीमुळे के. एल. राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी हार्दिक पंड्या, करुण नायर आणि जयंत यादव यांना संधी मिळाली आहे. 9 नोव्हेंबरला राजकोट कसोटीनं या मालिकेची सुरुवात होईल. या दौऱ्यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. एम.एस.के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत टीम इंडियाची निवड करण्यात आली.

भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार)
अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
चेतेश्वर पुजारा
गौतम गंभीर
अमित मिश्रा
रविंद्र जाडेजा
करुण नायर
मुरली विजय
आर. अश्विन
वृद्धिमान साहा
उमेश यादव
हार्दिक पंड्या
जयंत यादव
मोहम्मद शमी
इशांत शर्मा

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी - 9 ते 13 नोव्हेंबर – राजकोट

दुसरी कसोटी- 17 ते 21 नोव्हेंबर – विशाखापट्टणम

तिसरी कसोटी- 26 ते 30 नोव्हेंबर – मोहाली

चौथी कसोटी- 8 ते 12 डिसेंबर – मुंबई (वानखेडे स्टेडियम)

पाचवी कसोटी- 16 ते 20 डिसेंबर – चेन्नई

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा