मुंबई - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला अपेक्षित यश मिळाले नसले तरी तेथेच झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी सोनेरी कामगिरी केली. या खेळाडूंचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी मुंबईत सत्कार केला.
पॅरालिम्पिकमध्ये भारताने दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके पटकावली होती. देवेंद्र झाझरिया ( भालाफेक) आणि मरियप्पन थांगवेलू ( उंच उडी) यांनी सुवर्णपदक पटकावले. तर दीपा मलिकने गोळाफेकमध्ये रौप्यपदक आणि वरुण सिंगने उंच उडीत कांस्यपदक जिंकले होते. यावेळी पदकविजेत्यांचा गौरव करताना सचिनने त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले.