Advertisement

मार्च महिना नवीन मालिकांचा

महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवीन कथा घेऊन मार्च महिन्यात 'झी मराठी' नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मार्च महिना नवीन मालिकांचा
SHARES

महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवीन कथा घेऊन मार्च महिन्यात 'झी मराठी' नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापैकी 'पाहिले न मी तुला' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली असून 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईकही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मनोरंजनाचा विचार करताना पुढच्या काळात 'उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा' या घोषवाक्यासह झी मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज्याच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेल्या कथा मालिकारूपात पाहायला मिळणार असून मार्चमध्ये दर रविवारी एक सोहळा आणि दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,' अशी माहिती 'झी मराठी' चे व्यवसायप्रमुख निलेश मयेकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि भारताबाहेरही मराठी माणसांचे विश्व आहे. त्याही कथांवर आधारित मालिका सुरू करण्यात येणार असल्याचं मयेकर यांनी स्पष्ट केलं.

गेल्यावर्षी 'रात्रीस खेळ चाले' मालिकेचे दुसरे पर्व लोकांनी पाहिले. या दुसऱ्या पर्वालाही  प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि 'अण्णा नाईक' ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे नवीन वर्षांत अण्णा नाईक आणि त्यांचा खेळ पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र मालिकेचे हे तिसरं पर्व आहे की वेगळे कथानक पाहायला मिळणार, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. मालिकेच्या नवीन पर्वाच्या पटकथा आणि लेखनाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रह्लाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांच्या खांद्यावर आहे. राजेंद्र घाग रत्नागिरीचे असून ते सिंचन विभागात कार्यरत होते. आपली नोकरी सांभाळून मासिकांत कथा लिहिणाऱ्या घाग यांनी साठाव्या वर्षी पहिल्यांदा मालिकेसाठी लेखन केलं.

हेही वाचा- सोहम बांदेकरचं छोट्या पडद्याद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

याशिवाय, 'पाहिले न मी तुला' ही आणखी एक नवीन मालिका सुरू होणार असून यात अभिनेता शशांक केतकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या वाहिनीवर सुरू असलेल्या 'माझा होशील ना' या मालिकेत सुयश पटवर्धनची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी आणि नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोघेही नव्या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

राज्याच्या विविध भागातील नव्या दमाचे लेखक वाहिनीशी जोडले गेले आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचा लेखक तेजस घाडगेने पहिल्यांदाच इतकी मोठी मालिका केली होती. आता 'काय घडलं त्या रात्री' ही मालिका तो लिहितो आहे. सातारचा विशाल कदम आणि स्वप्निल गांगुर्डे यांनी मिळून 'देवमाणूस' मालिकेची कथा लिहिली आहे, या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. याआधी राजू सावंत यांनी या आधी तू तिथे मी, जय मल्हार, रात्रीस खेळ चाले ची दोन्ही पर्व, लागीर झालं जी यांसारखे दर्जेदार कार्यक्रम दिले आहेत.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा