देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ABSS अंतर्गत १५ स्थानकांचे रूप पालटणार असल्याची माहिती दिली आहे.
'या' स्थानकांचा कायापालट
कोणते बदल करण्यात येणार?
रेल्वेने रेल्वे वापरकर्ते, प्रवासी वापरकर्ते संघटना आणि स्थानकावरील विविध सेवा प्रदात्यांकडून विशिष्ट स्थानकावरील आवश्यकतांबद्दल त्यांचे मत सुचवण्यासाठी अभिप्राय मागवले होते.
एका निवेदनात, झोनल रेल्वेने, “१५ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी @drmmumbaincr वर ईमेल आयडी किंवा TwitterHastagas वर स्थानकांवर आवश्यक सुविधांच्या सुधारण्यासाठी सूचना द्याव्यात.” असे सांगितले होते. तसेच कामाच्या टप्प्यावर आधारित सूचनांचा रेल्वेतर्फे विचार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा