Advertisement

बीकेसीत लवकरच धावणार स्वयंचलित पाँड कार

बीकेसीला फास्ट ट्रँकवर आणण्यासाठी स्वयंचलित पाँड कार या भागात लवकरच धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीकेसीत लवकरच धावणार स्वयंचलित पाँड कार
SHARES

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये (बीकेसी) अनेक व्यापरी कंपन्या असून, मोठ्या प्रमाणात कर्मचारी याठिकाणी येत असतात. या ठिकाणी काम करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करून कार्यालय गाठावं लागतं. यामध्ये कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ खर्च होतो. त्यामुळं प्रवासासाठी लागणारा वेळेसह इंधन आणि पैशाचा अपव्यय होत असून प्रदूषणातही भर पडत आहे. ही कोंडी फोडून बीकेसीला फास्ट ट्रँकवर आणण्यासाठी स्वयंचलित पाँड कार या भागात लवकरच धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आँटोमेटेड रँपिड ट्रान्झिट सिस्टिम (एआरटी) सुरू करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. जगातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या रस्त्यांपैकी एक असलेला पश्चिम द्रुतगती मार्ग बीकेसीला जोडला गेलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ ते ६ प्रवाशांना या पाँड कारमधून वाहतूक सुविधा मिळणार आहे. या पॉंड कारसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जाणार असून त्यासाठी कोणतंही इंधन किंवा बँटरीची गरज भासणार नाही.

या प्रवासासाठी ठराविक अंतरांवर स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. वशिष्ठ ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना दरम्यानची स्टेशन बायपास करता येणार आहे. मार्गिकेवर  सतत एकापाठोपाठ पाँड कार धावणार असल्याने प्रवाशांना वाहनांच्या प्रतीक्षेत तिष्ठत उभे रहावं लागणार नाही. 

या भागात वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या भागात ये-जा करणाऱ्या लोकांसाठी विद्यमान वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. सध्या बीकेसी परिसरात येणासाठी कुर्ला रेल्वे स्टेशनहून रिक्षा, टँक्सी किंवा बेस्टच्या बसचा पर्याय उपलब्ध आहे. चुनाभट्टी ते बीकेसी हा फ्लायओव्हर सुरू झाला असला तरी एमटीएनएल जंक्शन ते कुर्ला स्टेशन हे अंतर पार करण्यासाठी खासगी वाहने, रिक्षा टँक्सीला १५ ते २० मिनिटे तर बसला २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. 

कलानगर इथं २ पुलांचं काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्यामुळं बीकेसीतील अंतर्गत प्रवासी सेवा अपेक्षेएवढी वेगवान होईल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएनं एआरटीचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शुन्य कार्बन उत्सर्जनाच्या तत्वावर धावणऱ्या या अद्ययावत आणि स्वयंचलित प्रवासी सेवेची आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता तपासण्याचं काम लवकरच सुरू होणार आहे.

या वाहतूक व्यवस्थेचा रुट कसा असणार, त्याची उभारणी कशा पध्दतीनं होणार, त्यांची क्षमता किती प्रवासी वाहनाची असणार, त्या सेवेतून किती उत्पन्न मिळणार, आर्थिकदृष्ट्या ही सेवा कशी व्यवहार्य ठरणार यासाठी जगभरात अस्तित्वात असलेल्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल अशा विविध आघाड्यांवरील सर्वेक्षण करण्यासाठी एमएमआरडीए सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.



हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा