Advertisement

बेस्टच्या तब्बल ८९८ जुन्या गाड्या भंगारात निघणार


बेस्टच्या तब्बल ८९८ जुन्या गाड्या भंगारात निघणार
SHARES

बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यातील ८९८ जुन्या गाड्या येत्या मार्चपर्यंत भंगारात काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या गाड्या भंगारात काढताना नव्या गाड्या घेण्याबाबत काहीच निर्णय न झाल्याने बेस्टच्या प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागणार आहे. भंगारात जाणाऱ्या ८९८ बसमध्ये ३० ते ४० दुमजली आहेत. सध्या बेस्टकडे १२० दुमजली बस असून ७० बसच सेवेत आहेत.

बेस्ट प्रवाशांची संख्या १६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या प्रवाशांकरिता लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणींना तोंड देत बेस्ट आपल्या ताफ्यातील ३,५०० पैकी ३,२०० ते ३,४५० गाड्या दररोज रस्त्यावर उतरवत आहे. यातील अनेक गाड्यांचे आयुुर्मान संपत आल्याने त्या वारंवार बिघडतात. काही तर चालविताही येत नाहीत. त्यात बेस्टकडील स्वमालकीच्या ३,५०० पैकी ८९८ बसचे आयुर्मान संपत असून त्या मार्च २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्यात भंगारात काढल्या जाणार आहेत.

निधीअभावी या गाड्यांच्या जागी नव्या बसगाड्या खरेदी करण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे भाडेतत्त्वावरील १,२०० पैकी काही गाड्यांचे आगमनही निरनिराळ्या कारणावरून लांबले आहे. बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील १,२२७ मिनी वातानुकू लित बसपैकी ४६२ बस दाखल झाल्या आहेत. ऊर्वरित ७६५ मिनी वातानुकू लित बसगाड्या दाखल होण्यास विलंब होत आहे.

बसगाड्यांची सद्य:स्थिती प्रवाशांना मोबाइलवर किंवा बस स्थानकांवरील इंडिके टरवर समजावी, बसमध्ये पुढच्या स्थानकाची होणारी उद्घोषणा इत्यादीसाठी नवीन बसमध्ये आयटीएमएस(इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम) यंत्रणा बसविण्यात येत असून टाळेबंदीमुळे त्याला लागणारे साहित्य मिळण्यात कं त्राटदारांना अडचणी आल्या. परिणामी ऊर्वरित बससाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.  ७६५ वातानुकू लित बस एप्रिल, मेपर्यंत प्रवाशांंच्या सेवेत येणार होत्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा