देशातील तीन महत्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आता होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईसह (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) Mumbai) नवी दिल्ली (New Delhi Railway Station), अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा (Ahmedabad Railway Station) पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
बुधवारी यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यातच नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
A walk-through of the graphical representation of the to be redeveloped Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station, Mumbai.#NayeBharatKaNayaStation pic.twitter.com/geueYPauRg
— Ministry of Railways (@RailMinIndia) September 28, 2022
देशभरात सध्या 199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे. तर 32 स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.
'या' सुविधा देणार
हेही वाचा