बेस्टच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बेस्ट प्रशासन सतत प्रयत्न करत असते. अशातच आता इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार, बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रीक बसची संख्या वाढविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वच चर्चा करतात. पण बेस्टनं इलेक्ट्रिक बसगाड्या वापरात आणून प्रत्यक्ष कृती केली आहे. कोविड काळातही बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावलं. कर्मचाऱ्यांमुळं बेस्टला प्रगती करणं शक्य होत आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
बेस्ट, लोकल, मेट्रोसाठी एकच तिकीट असावे असे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्याची आठवणही असून त्यावरही काम सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. माहिम येथील बेस्ट बस आगाराच्या नव्या इमारतीसह इलेक्ट्रिक बसेगाडीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा उपस्थित होते. इलेक्ट्रीक बसमुळे पर्यावरणाचीही हानी होणार नाही. प्रदुषण कमी होणार आहे.
बेस्टच्या वाहक नेहमी प्रवाशांना आगे बढो आगे बढो म्हणत असतो. तसाच देशालाही आगे बढो आगे बढो म्हणणारा नेता, पंतप्रधान हवा असे नेहमीच वाटायचे. बस कंडक्टरचे कामही तिकीट द्यायचेच. काही साम्य दिसत ना आपल्याला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
बेस्टची इलेक्ट्रिक बस