याचिकेतील मागण्या
या मागण्या चिराग चनानी, विनय कुमार आणि सुमीत खन्ना या ३ वकिलांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. वकीलवर्ग हा मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये वास्तव्यास आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली.
यावेळी महापालिकेचे शिक्षण आणि कंत्राटी कामगारांना कोरोनाची कामे लावण्यात आलेली आहेत. त्यामुळं त्यांना विशेष लोकल प्रवास उपलब्ध करण्यात आलेला असल्याचं महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
न्यायालयाच्या अन्य कर्मचारी वर्गालाही या विशेष लोकलमधून प्रवासास परवानगी देण्यात आलेली नाही. न्यायालयाचे कामकाज हे दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे न्यायालयीन कर्मचारी न्यायालयात स्व खर्चाने जात आहेत. वकिलांनीही स्वत:ची सोय करावी, असे सांगत राज्य सरकारने याचिकेला विरोध केला. मात्र याप्रकरणी न्यायालयानं याचिकेची दखल घेत राज्य व केंद्र सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.