Advertisement

विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना गावी पोहोचवणार लालपरी धावणार


विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना गावी पोहोचवणार लालपरी धावणार
SHARES

मुंबईसह पुण्यासह विविध जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूरांनाही त्यांच्या गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेत श्रमिक ट्रेन सुरु केली आहे. आता, राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, नातेवाईक आणि मजूरांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं पुढाकार घेतल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

राजस्थानातील कोटा इथं महाराष्ट्रतून जवळपास २ हजार विद्यार्थी राजस्थानात लॉकडावूनमध्ये अडकले होते. राजस्थानात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना आपल्या राज्यात आणि गावी पोहोचविण्याचं काम एसटी महामंडळानं केलं. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी राज्य सरकार आणि एसटी महामंडळानं आभारही मानलं. आता, राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी लालपरी धावणार आहे.

येत्या २ दिवसात त्यांसंदर्भातील प्लॅन तयार होणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं. एसटी महामंडळाकडून एक पोर्टल तयार केले जाणार आहे. त्या पोर्टलवर नागरिकांनी आपली माहिती भरावयाची आहे. मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना बसमधून सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊच्या नियमांचं पालन करत त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम महामंडळाकडून करण्यात येणार आहे. केवळ कन्टोनमेंट झोनमधील नागरिकांना या बसमधून प्रवास करता येणार नसल्याचं परब यांनी स्पष्ट केलं.

राज्यात विविध ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांच्या गावांच्या दिशेने पाठवण्यासाठी एसटीच्या जवळपास १० हजार बस तयार आहेत. मात्र, एवढ्या बस सोडणं शक्य नाही. त्यामुळं गरजेनुसार बस आणि कैक फेऱ्या याअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाने यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. पण, त्यासाठी राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

राज्य सरकारनं तसा निधी उपलब्ध करुन दिल्यास, प्रवाशांना मोफत प्रवास देता येऊ शकतो, असंही परब यांनी सांगितले. राज्यातील विविध जिल्ह्यांच्या विभागातून या बस सोडण्यात येणार असून एका बसमध्ये २५ जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत याची नियमावली आणि पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा