Advertisement

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली

मुंबईसह आसपासच्या परिसरात गुरूवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाली असून, सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात गुरूवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाली असून, सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मध्य रेल्वेच्या कसारा घाटात दरड कोसळल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळं कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी महामंडळाची एसटी प्रवाशांच्या मदतीला धावून आली आहे. कसारा, इगतपूरी इथं अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं गुरुवारी पहाटे ४ वाजता तातडीनं १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडल्याची माहिती परिवहन मंत्री तथा ॲड. अनिल परब यांनी दिली.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून दिल्या. सदर वाहतुक गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५८०० हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.  

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.




हेही वाचा - 

मालमत्ता थकबाकीदारांवर आता प्रत्यक्ष कारवाई, नवी मुंबई पालिकेचा निर्णय

अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा