Advertisement

मुंबई मेट्रो सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल

सर्व मुंबईकरांसाठी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून सुरू होणार आहे.

मुंबई मेट्रो सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल
SHARES

मुंबईचं अर्थचक्र हळुहळु पूर्वपदावर येत असतानाच आता मुंबईतील वाहतूक (mumbai transport) सेवाही सुरू करण्यात येत आहे. रविवारी मोनोरेल (monorail) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून सोमवारपासून मेट्रो सेवाही (mumbai metro) सुरू होणार आहे. सर्व मुंबईकरांसाठी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून सुरू होणार आहे. एकतृतीयांश प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेली मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर सर्व सुरक्षा चाचण्या आणि विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून कार्यरत होत आहे.

सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार असून एका वेळी फक्त ३६० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. अंतरनियम आणि आरोग्य सुरक्षेसंदर्भात मेट्रो रेल्वे आणि स्थानकांवर व्यवस्थापनानं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मेट्रो- १चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारपासून मेट्रोची वारंवारिता ६.३० ते ८ मिनिटांवर आणण्यात आली आहे. कोरोनापूर्व काळात हीच वारंवारिता ३ ते ५ मिनिटे इतकी होती. त्यामुळे कोरोनापूर्व काळात दिवसाला ३५० ते ४०० फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी आता दिवसाला केवळ २०० फेऱ्या होणार आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांनतर फेऱ्यांची संख्या वाढवायची का, याबाबत विचार केला जाणार आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी संख्या वाढल्यास घाटकोपर आणि वर्सोवा येथे प्रत्येक एक मेट्रो कायम तयारीत ठेवलेली असेल. त्याचा वापर त्वरित केला जाईल.

असा होणार प्रवास

  • प्रवासी संख्येवरदेखील नियंत्रण आणले असून एका फेरीत १३५० प्रवाशांऐवजी ३६० प्रवासीच आता प्रवास करू शकणार आहेत. 
  • प्रत्येक गाडीचे दररोज रात्री र्सवकष र्निजतुकीकरण केले जाणार आहेत. 
  • प्रत्येक फेरीनंतरदेखील र्निजतुकीकरण करण्यात येणार आहे. 
  • प्रवाशांना मास्क आणि तापमान तपासूनच प्रवेश दिला जाणार आहे.
  • एक सोडून एक आसनव्यवस्थेमुळे १०० प्रवासी बसून प्रवास करू शकतील.
  • उभे राहून प्रवास करण्यास २६० प्रवाशांना परवानगी.
  • प्लास्टिक टोकन बंद.
  • कागदी तिकिट अथवा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल तिकिटाचा वापर.
  • रिचार्ज कार्डावरील शिल्लक रकमेवर परिणाम होणार नसून, सहजपणे वापरता येईल. 
  • तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • स्थानकात प्रवेश करणे आणि बाहेर जाण्यासाठी केवळ २ ते ४ मार्गाचाच वापर करता येईल.
  • प्रत्येक स्थानकात गर्दीनुसार ३० ते ६० सेकंदांचा थांबा.
  • वातानुकूलित यंत्रणेचे तापमान २५ ते २७ सेंटिग्रेड इतके ठेवले जाईल. 
  • ताजी हवा येण्यासाठी काही बदल केले जातील.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा