Advertisement

मध्य, पश्चिम व हार्बर या मार्गावरील कल्व्हर्ट स्वच्छतेसाठी दिलेला हा निधी वाया

मुंबईत पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसतो.

मध्य, पश्चिम व हार्बर या मार्गावरील कल्व्हर्ट स्वच्छतेसाठी दिलेला हा निधी वाया
SHARES

मुंबईत पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसतो. कारण पावसाचं पाणी सचल्यामुळं मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. त्यामुळं पाणी साचू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी रुळांखालील नाल्यांची सफाई करण्यासाठी पालिकेतर्फे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र दरवर्षी पावसाळ्यात या मोऱ्या (कल्व्हर्ट) तुंबतातच आणि रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. त्यामुळे रेल्वेच्या मध्य, पश्चिम व हार्बर या तीनही मार्गावरील कल्व्हर्ट स्वच्छतेसाठी दिलेला हा निधी वायाच गेल्याचे दिसत आहे.

गेल्या १२ वर्षांत पालिके ने रेल्वेला दिलेला ३० कोटींचा निधी असाच पाण्यात गेला असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेची नालेसफाई ही जशी नेहमी टीके चा विषय ठरते तशीच रेल्वे रुळांखालील नाल्यांचे प्रवाह साफ करण्यावरून रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. हद्दीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यास परवानगी नसल्यामुळे दरवर्षी रेल्वे रुळांखालील नाल्यांच्या प्रवाहांची स्वच्छता रेल्वेमार्फत के ली जाते. पालिका त्याकरिता रेल्वे प्रशासनाला निधी देत असते. प्रत्येक रेल्वे मार्गाला साधारण अडीच ते ३ कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो.

गेल्या १२ वर्षांत ३० कोटींहून अधिक रक्कम तीनही रेल्वे मार्गाच्या ११६ कलव्हर्टच्या स्वच्छतेसाठी देण्यात आले आहेत. मात्र मागील १२ वर्षांत रेल्वेला ३० कोटी देण्यात आले आहेत. मात्र, आजमितीस खर्च आणि कामांचे कोणत्याही प्रकारचे परीक्षण रेल्वेने किंवा महापालिकेने केल्याचे दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे सेवा कुर्ला आणि सायनदरम्यान ठप्प होते. मुंबईत बुधवारी झालेल्या पावसानेही काही तासांतच रेल्वे वाहतूक बंद करण्याची वेळ आली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा