वाहनधारकांमध्ये व्हीआयपी क्रमांक मिळवण्याची भलतीच क्रेझ असते. कोणी आपला लकी नंबर तर कोणी जन्म तारीख असलेला गाडीचा नंबर प्लेट मिळवण्यासाठी उत्सुक असतो. त्यासाठी वाहनधारक कितीही पैसे मोजायला तयार असतात. आणि याच व्हीआयपी क्रमांकामुळे राज्यातील आरटीओला चांगलाच नफा झाला आहे.
व्हीआयपी क्रमांकामुळ राज्यातील आरटीओच्या तिजोरीत गेल्या ८ महिन्यांत ७७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईला ६ कोटी ८ लाख रुपयांचा नफा झाला आहे.
मुंबईतील ताडदेव, वडाळा, बोरिवली आणि अंधेरी आरटीओ विभागात गेल्या ८ महिन्यांत एकूण ६ हजार ६५२ व्हीआयपी क्रमांकाची नोंदणी करण्यात आली.
ठाणे आरटीओ विभागात १० हजार ७४४ व्हीआयपी क्रमांकाची नोंद झाली असून ९ कोटी ९८ लाखांची कमाई केली आहे.