'कॅशलेस इंडिया'च्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल पेमेंट करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाने कॅशलेस तिकीट सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी 'चलो कार्ड', 'चलो अॅप' सेवा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्टचे चलो कार्ड मिळणे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
नाणी न मिळण्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात अनेकदा वाद होतात. त्यामुळे बेस्टने रोखीचे व्यवहार टाळून तिकीट आणि पाससाठी 'चलो कार्ड' आणि 'चलो अॅप'ची सुविधा सुरू केली. अनेक प्रवाशांनी हे अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले आहे.
मात्र, अनेकांना मोबाइल अॅपपेक्षा कार्डचा पर्याय अधिक सोयीचा वाटत आहे. पण, सध्या बेस्ट उपक्रमात 'चलो कार्ड'चा तुटवडा जाणवू लागला आहे. बेस्टच्या कंडक्टरकडून प्रवाशांकडून कार्डची मागणी केली जाते.
मात्र, कार्ड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. विक्री केलेल्या प्रत्येक कार्डासाठी वाहनांना 50 रुपये देखील मिळतात. आता ही रक्कमही बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह चालक-वाहकांमध्ये असंतोष आहे.
हेही वाचा