गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटीने यावर्षी बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येतील.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. रेल्वेनंतर आता एसटी महामंडळाकडूनसुद्धा कोकणच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटीने यावर्षी बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येतील.
१ ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून 2 हजार 225 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या साऱ्यात कुटुंब कबिला, नातेवाईक, एकच गाव वा परिसरात राहणाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात ग्रुप आरक्षणांतर्गत बसला प्राधान्य दिलं जातं. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं एसटीनेही सकारात्मकरीत्या विचार करून या बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. मागील वर्षी 2 हजार 216 इतक्या बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी त्यामधे वाढ करून 2 हजार 225 जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
आरक्षण ९ ऑगस्टपासून
येत्या ९ ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येत आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा.
कोकणातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी या सुविधेचा वापर करण्याचं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
१ ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून 2 हजार 225 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या साऱ्यात कुटुंब कबिला, नातेवाईक, एकच गाव वा परिसरात राहणाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात ग्रुप आरक्षणांतर्गत बसला प्राधान्य दिलं जातं. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं एसटीनेही सकारात्मकरीत्या विचार करून या बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. मागील वर्षी 2 हजार 216 इतक्या बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी त्यामधे वाढ करून 2 हजार 225 जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
आरक्षण ९ ऑगस्टपासून
येत्या ९ ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येत आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा.
कोकणातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी या सुविधेचा वापर करण्याचं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
खूशखबर! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या