वयाची ५०शी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळानं तयारी सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतलं जाणार आहे. त्यांनी होकार द्यावा याकरिता समन्वयाची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या परिपत्रकामुळं महामंडळाच्या २७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
महामंडळ स्वेच्छासेवानिवृत्ती योजना राबविणार असल्याची हवा मागील काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ८ डिसेंबर रोजी महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी परिपत्रक जारी केलं आहे. हे परिपत्रक विभाग, आगार, घटक स्तरावील सूचना फलकांवर लावले जाणार आहे.
५० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना योजना समजावून सांगितली जाणार आहे. संमतीपत्र भरून दिलं म्हणजे त्यांची स्वेच्छासेवानिवृत्ती मंजूर झाली, असे समजण्यात येऊ नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये मतप्रवाह
अशी आहे योजना