Advertisement

'त्या' व्यक्तीला भरपाई द्या' : सुप्रीम कोर्टाचे रेल्वे प्रशानाला आदेश


'त्या' व्यक्तीला भरपाई द्या' : सुप्रीम कोर्टाचे रेल्वे प्रशानाला आदेश
SHARES

ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, रेल्वे प्रशासनाला त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई द्यावीच लागेल, असे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले आहेत.


नुकसानभरपाई द्यावीच लागेल

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी जखमी होणं किंवा प्रवाशाचा मृत्यू होणं, ही अतिशय दुर्देवी घटना आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. प्रवाशाचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचं सांगून रेल्वे प्रशासन जबाबदारी झटकू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.


'अशा' प्रकारांमध्ये भरपाई नाही

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती ए. के. गोयल आणि न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठासमोर रेल्वे मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी झाली. रेल्वे कायदा 1989 त्या सेक्शन 124A अंतर्गत आत्महत्या किंवा आजारपणामुळे होणारे मृत्यू किंवा स्वतःला इजा पोहोचवण्याच्या दृष्टीने घडलेले प्रकार याला अपवाद असतील, अशा प्रकारांमध्ये भरपाई मिळणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.


'मग नुकसान भरपाई द्यावी लागेल'

प्रवाशाकडे तिकीट नाही म्हणून एखाद्या प्रवाशाला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही. पण, भरपाईचा दावा सिद्ध करण्यासाठी प्रवासासंदर्भातील अन्य पुरावे सादर करणे गरजेचं असेल. अपघात हा प्रवासादरम्यान होऊ शकतो किंवा प्रवासानंतर ट्रेनमधून उतरतानाही होऊ शकतो. स्टेशन परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई द्यावी लागेल, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा