मुंबई - मोबाईल अॅपवर आधारित ओला, उबर कंपन्यांमुळे मुंबईत काळी-पिवळी टॅक्सीवाल्यांचा धंदा कमी झाला. आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबईबाहेर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिवहन विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. सव्वादोन वर्षांपासून काळी-पिवळी टॅक्सी आणि ओला, उबर कंपन्यांमध्ये जणू शीतयुद्ध सुरू आहे. प्रवाशांना विविध सवलती देत असल्यानं, तसच लगेच सेवा देत असल्यामुळे अॅपवर आधारित कंपन्यांची टॅक्सी सेवा लोकप्रिय झाली आहे.