Advertisement

मुंबईहून केवळ ४५ मिनिटात पोहोचता येणार नवी मुंबईला

मुंबई ते नवी मुंबई हे अंतर रस्तेमार्गे पार करण्यासाठी जवळपास तास ते दीड तास लागतो. मात्र आता हे अंतर केवळ ४५ मिनिटांत प्रवाशांना पुर्ण करता येणार आहे.

मुंबईहून केवळ ४५ मिनिटात पोहोचता येणार नवी मुंबईला
SHARES

मुंबई ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दैनंदिन जीवनात नेहमी मुंबई ते नवी मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ प्रवासात अडकून रहावे लागते. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर रस्तेमार्गे पार करण्यासाठी जवळपास तास ते दीड तास लागतो. मात्र आता हे अंतर केवळ ४५ मिनिटांत प्रवाशांना पुर्ण करता येणार आहे. याच कारण म्हणजे या मार्गासाठी आता जलमार्गाची निवड करण्यात आली असून, या मार्गाने प्रवाशांना केवळ ४५ मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे.

दक्षिण मुंबईतील माझगाव ते नवी मुंबईतील बेलापूरदरम्यान जलमार्ग सेवा लवकरच सुरू होत आहे. या मार्गाची चाचणी यशस्वी झाली आहे. आता प्राथमिक तत्वावरील (पायलट) चाचणी सुरू होत आहे. मुंबईहून मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत या सेवा सुरू होत आहे. तर महाराष्ट्र मेरिटाइम मंडळाचे त्याला सहकार्य आहे. याअंतर्गतच माझगाव ते बेलापूरदरम्यान प्राथमिक फेरी ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झाली.

केंद्रीय जलमार्ग व जहाज बांधणी मंत्रालयाने ६ महिन्यांपूर्वी मुंबईला नवी मुंबई व कोकणशी जलमार्गे जोडण्यासाठी ६ नव्या मार्गांना परवानगी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळं आता लवकरच प्राथमिक चाचणी सुरू होत आहे. ही कॅटामरान श्रेणीतील सेवा असेल. त्यामध्ये एका वेळी ६५ ते ७० प्रवासी प्रवास करू शकतील. माझगाव येथील देशांतर्गत क्रुझ टर्मिनलवरून ही सेवा सुरू होईल. तर बेलापूर येथील जेट्टीचे कामदेखील पूर्ण झाले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा