राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून भांडुपकरांना स्वस्त दरात आरगॅनिक भाज्या मिळवून देण्यासाठी सह्याद्री सेवा प्रतिष्ठाननं पुढाकार घेतलाय. भांडुपमध्ये यासाठी भाजीविक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तिन्ही दिवशी सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यत हे भाजीविक्री केंद्र सुरू असेल. थेट शेतकऱ्यांच्या शेतातील भाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्यात. यामध्ये दलाल नसल्यानं भांज्या स्वस्त दरात उपलब्ध असल्याचं सह्याद्री सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमेंद्र शृंगारे यांनी सांगितले.