मराठा सहकारी बँकेवर पन्नास कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे. त्यामुळे आरबीआयनं बँकेवर काही निर्बंध घातले. निर्बंध घातल्यानं खातेदार, ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर गर्दी केली. पण ठेवीदार आणि खातेदारांना एका वेळी फक्त हजार रूपयेच काढता येत आहेत. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.