Advertisement

आमिरसाठी अतुल बनला लेखक!

जवळजवळ १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश ओमप्रकाश मेहरांच्या 'रंग दे बसंती' या सिनेमात आमिर आणि अतुल एकत्र दिसले होते. या सिनेमात आमिरनं डीजेची, तर अतुलनं लक्ष्मण पांडेची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आमिरनं अतुलसोबत एक कल्पना शेअर केली होती.

आमिरसाठी अतुल बनला लेखक!
SHARES

अभिनेता आमिर खान आणि त्याचा स्वभाव सर्वांनाच ठाऊक आहे. एखाद्याशी त्याचं नातं जुळलं की ते कायमचंच जोडलं जातं. अभिनेता अतुल कुलकर्णीसोबतही त्याचं असंच एक अनोखं मैत्रीचं नातं आहे. या नात्यामुळंच लवकरच तो अतुलनं लिहिलेल्या सिनेमात शीर्षक भूमिकेत दिसणार आहे.


हॅालीवूड सिनेमाचा रिमेक 

आमिरनं नुकतीच आपल्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचं शीर्षक आहे 'लाल सिंग चढ्ढा'. हा ओरिजनल सिनेमा नसून, टॅाम हॅन्क्स यांच्या 'फॅारेस्ट गम्प' या हॅालीवूड सिनेमाचा हिंदी रिमेक असेल. यापूर्वी आमिरच्या होम प्रॅाडक्शनमध्ये तयार झालेल्या 'सिक्रेट सुपरस्टार'चे दिग्दर्शक अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. वायकाॅम १८ मुव्हीज आणि आमिर खान प्रॅाडक्शन्स एकत्रितपणं या सिनेमाची निर्मिती करणार आहे. याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचं लेखन अभिनेता अतुल कुलकर्णीनं केलं आहे.


आमिरची कल्पना

 जवळजवळ १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश ओमप्रकाश मेहरांच्या 'रंग दे बसंती' या सिनेमात आमिर आणि अतुल एकत्र दिसले होते. या सिनेमात आमिरनं डीजेची, तर अतुलनं लक्ष्मण पांडेची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आमिरनं अतुलसोबत एक कल्पना शेअर केली होती. त्यावरून अतुलला 'लाल सिंग चढ्ढा' या सिनेमाची कथा लिहिण्यास प्रेरणा मिळाल्याचं समजतं. 'फॅारेस्ट गम्प' हा सिनेमा १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. 


आठ वर्षांपासून प्रयत्नशील 

'लाल सिंग चढ्ढा' ही व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी आमिर पुन्हा एकदा बॅाडी ट्रान्सफॅार्मेशनच्या प्रक्रियेतून जाणार आहे. या भूमिकेसाठी २० किलो इतकं वजन कमी करणार असल्याचं आमिरनं स्वत: सांगितलं आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला आॅक्टोबर महिन्यात प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यापूर्वी जवळजवळ सहा महिने आधी आमिर या सिनेमाची तयारी सुरू करणार आहे. 'फॅारेस्ट गम्प'वर हिंदी सिनेमा बनावा असं आमिरला खूप वर्षांपासून वाटत होतं. यासाठी मागील आठ वर्षांपासून तो प्रयत्नशील होता. अखेर आमिरच्या प्रयत्नांना यश आलं आणि आपल्या मनातील सिनेमा करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.


अतुल पडद्यामागं

'रंग दे बसंती'च्या निमित्तानं एकत्र आलेली आमिर-अतुल ही जोडी 'लाल सिंग चढ्ढा'साठी पुन्हा एकत्र आली आहे. सध्या तरी यापैकी आमिर पडद्यावर दिसणार असून, अतुल पडद्यामागं राहून काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण या सिनेमात अमिरच्या जोडीला अतुलही एखाद्या व्यक्तिरेखेत दिसला तर नवल वाटता कामा नये. असं झालं तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा दोन तगड्या अभिनेत्यांची जुगलबंदी पाहण्याची संधी लाभेल.



हेही वाचा -

राजामौलींसाठी आलिया बनणार सीता!

बघा, तापसीचा जलवा!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा