विविध राष्ट्रियीकृत बॅंकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रियीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी २६ आणि २७ सप्टेंबरला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. संघटनांचा २ दिवस संप आणि आठवडा सुट्टी यामुळं जवळपास ७ दिवस बॅंका बद राहणार होत्या. परंतु, संघटनांच्या समस्येबाबत अर्थसचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं हा संप स्थगित करण्यात आला आहे. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक संघटनांनी प्रसिद्ध केलं आहे.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिस या ४ संघटनांनी संपाचा निर्णय घेतला होता. संघटनांच्या संपामुळं ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागणार होतं. केंद्रातील मोदी सरकारनं देशातील १० सरकारी बॅंकांचं ४ बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी ऑफिसर्स ट्रेड यूनियननं संपाची हाक दिली होती.
दरम्यान, या ४ संघटनांच्या नेत्यांसोबत अर्थसचिवांनी बैठक घेतली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर चारही संघटनांनी संयुक्तीक प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये संप मागे घेतल्याची घोषणा केली. संघटनांच्या या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरावस्था, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय
मुंबईतील 'या' रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद