Advertisement

दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार

१ हजार ४९४ जादा 'दिवाळी स्पेशल बस' सोडण्याचा निर्णय

दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा (Extra Buses for Diwali Vacation) बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते. या दरम्यान, एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात.

तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन 1494 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

मागील वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण आणि इतर मागण्यांसाठी दिवाळीतच आंदोलन पुकारले होते. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला होता.

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद प्रदेशातून 368, मुंबई 228, नागपूर 195, पुणे 358, नाशिक 274 आणि अमरावती येथून 71 बस गाड्या सोडण्यात येणार आहे.

बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबईची मेट्रो लाईन 2A आणि 7 वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता

बेस्टची ‘दिवाळी सुपर सेव्हर ऑफर’, 9 रुपयांत 5 फेऱ्यांचा लाभ!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा