Advertisement

दरडींच्या संकटापासून वाचण्यासाठी पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना

धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून विविध पर्याय सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.

दरडींच्या संकटापासून वाचण्यासाठी पर्याय शोधा, आदित्य ठाकरेंची सूचना
SHARES

महाराष्ट्र सध्या विविध आपत्तींचा सामना करीत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि दरड कोसळल्याने आपत्ती ओढवली आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती असूनही नुकसान झालं, अशा आणि इतर धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून विविध पर्याय सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांचा आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, सबंधित विभागातील महानगरपालिकेचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

हेही वाचा- विनामास्क फिरणाऱ्या ३० लाख ४४ हजार मुंबईकरांवर कारवाई

ठाकरे यांनी पावसामुळे आपत्ती ओढवलेल्या मुंबई उपनगरातील ठिकाणांची मागील आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर आयोजित या बैठकीत त्यांनी या जागा अतिशय धोकादायक असल्याने जेथे मागणी आणि आवश्यकता आहे तिथं तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. 

तसंच जिथं संरक्षक भिंतींचा उपयोग होणार नाही अशा ठिकाणी तज्ज्ञांमार्फत इतर पर्यायांचा अभ्यास करावा, असं सांगितलं. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह महानगरपालिका, एमएमआरडीए, वन विभाग, म्हाडा आदी विभागांनी समन्वयाने काम करावे आणि वस्त्या असलेल्या ठिकाणांना प्राधान्य द्यावं, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी बोरीकर आणि महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी धोकादायक असलेल्या जागा आणि तिथं सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा