राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी निमित्त 'आनंदाचा शिधा' वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील 14 शेतकरी तसेच नागपूर विभागातील वर्धा येथील दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांना प्राधान्य कुटुंबांना 1 किलो रवा, बेसन, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे.
सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंबे आणि 7.5 लाख किसान योजना शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिदा” देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
हेही वाचा