Advertisement

आनंदाचा शिधा या दिवाळीत महाराष्ट्रात मिळणार नाही

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे.

आनंदाचा शिधा या दिवाळीत महाराष्ट्रात मिळणार नाही
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक योजनांवर परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेवर दरवर्षी 45,000 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च होत असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujabal) यांनी कबूल केले आहे की या आर्थिक बोजामुळे यावर्षी दिवाळीत गरिबांना दिला जाणारा आनंदाचा शिधा (anandacha shidha) थांबवण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीचा इतर महत्त्वाच्या योजनांवर परिणाम होत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सध्या सरकार पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 350 कोटी रुपये खर्चाची आनंदाचा शिधा योजना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे आणि सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधी देखील लाडकी बहीण योजनेत गेला आहे.

विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे आणि एक लोकप्रिय योजना सामान्य लोकांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, भविष्यात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर आनंद चा शिधा योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल.

परंतु सध्या लाडकी बहीण योजनेचा प्रचंड खर्च पाहता, सरकारने अनेक योजनांवर ब्रेक लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या दिवाळीत गरजू कुटुंबांना आनंद चा शिधा मिळणार नाही हे स्पष्ट आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस

उत्तराखंडमधील भूस्खलनात महाराष्ट्रातील नागरिक बेपत्ता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा