Advertisement

पालिकेत 900 कोटींचा कचरा घोटाळा


SHARES

मुंबई - यंदाचं वर्ष पालिकेतील नालेसफाई, रस्ते घोटाळ्याने गाजतानाच आता एन, एस आणि टी, वॉर्डमधील कचऱ्याची वाहतूक करताना 900 कोटींच्या कामांत घोटाळा झाला असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी स्थायी समितीत केलाय. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. या आरोपाबाबत प्रशासनाकडून येत्या स्थायी समितीत खुलासा केला जाणार आहे.
जीपीएस आणि व्हीटीएस ( व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम) च्या नोंदी तपासून कंत्राटदारांना बिल मंजूर करून देण्याचे आदेश असतानाही अभियंत्यांनी खोट्या नोंदी करून कामांच्या वेळा, मार्ग, काम समाप्तीची वेळ यात फेरफार केल्याचं देशपांडे यांनी म्हटलंय. तर याबाबत माहिती घेऊन येत्या स्थायी समिती सभेत खुलासा केला जाईल, असं अतिरिक्त आयुक्त पल्लवी दरा़डे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा