Advertisement

मृत प्राण्यांच्या दफनभूमीला मंजुरी

शहरात सद्यस्थितीत विविध भागात मृत होऊन पडणाऱ्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे.

मृत प्राण्यांच्या दफनभूमीला मंजुरी
SHARES

वसई विरार (virar) शहरात मृत झालेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी दफनभूमी (graveyard) नसल्याने त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या विल्हेवाट करण्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाली असल्याने लवकरच क्षेपणभूमी जवळ दफनभूमी तयार करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

शहरात पाळीव प्राण्यांबरोबरच अनेक बेवारस प्राणी विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. त्यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात.

शहरात सद्यस्थितीत विविध भागात मृत होऊन पडणाऱ्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे.

पाळीव प्राणी (pet animals)  मृत झाले की त्यांच्या शरीराची विल्हेवाट कशी लावायची याचा प्रश्न प्रत्येक प्राणीप्रेमींना पडतो. आयुष्यभर एखाद्या लेकरासारखे जपलेल्या प्राण्याची त्यांचा मृत्यू झाला अशी हेळसांड होणे कुणालाही आवडत नाही.

त्यामुळे या मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात दफनभूमीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.  तर दुसरीकडे बेवारस असलेले मृत प्राणी झालेले प्राणी ही उकिरड्यावरकिंवा नाल्या शेजारी टाकून दिले जातात. त्यामुळे त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.

परंतु महापालिकेच्या (vvmc) कार्यक्षेत्रात दफनभूमी नसल्याने विल्हेवाट लावण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने दफनभूमी उभारावी अशी मागणी ही नागरिकांमधून करण्यात येत होती.

सामाजिक कार्यकर्ते यांनी ही  याबाबत केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडे पत्रव्यवहार करून वसई विरार शहरातील मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीची समस्या मांडली होती. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या होत्या.

या सुचनेनंतर महापालिकेने गोखीवरे येथील क्षेपणभूमी जवळील भागात दफनभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावता यावी असा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी स्तरावर पाठविण्यात आला होता.  

त्या प्रस्तावास जिल्हाधिकारी स्तरांवरून परवानगी मिळाली असल्याने जनावरांच्या विल्हेवाट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच त्या ठिकाणी दफनभूमी उभारून मृत जनावरांची विल्हेवाट करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसारच विल्हेवाट करण्याची प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. मध्यंतरी पालिका गोखीवरे येथील कचराभूमीत मृत प्राण्यांची विल्हेवाट लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यामुळे नियमानुसार स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. शहरात कधी रस्त्याच्या कडेला, उघड्यावर मृत अवस्थेत प्राणी पडून असतील त्यांची विल्हेवाट योग्य रित्या लावावी असेही त्यांनी सांगितले आहे.



हेही वाचा

सुट्ट्या पैशांसाठी युपीआयचा पर्याय

मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा लिहण्याची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा